दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होइपर्यंत आंदोलन सुरूच!

महायुतीच्या बैठकीत निर्णय.. मुंबई, 11 ऑगस्ट 2020 दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार महायुतीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून पुढील टप्प्यात मुख्यमंत्र्यांना 5 लाख निवेदने देणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. या बैठकीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव … Read more

आशुतोष भाकरेच्या आईची काळजाला हात घालणारी पोस्ट!

मुंबई, दि. 11 ऑगस्ट मराठी कलाकार आशुतोष भाकरेनं आत्महत्या केली पण त्यावर फारसं कोणी लिहिले नाही. चर्चा होतेय ती फक्त सुशांत सिंगच्या आत्महत्येचीच कारण त्यात काही मंडळींनी मसाला भरला तर काहींनी त्याच्या आत्महत्येचे राजकारण करत आपली पोळी भाजण्याचा उद्योग केला. आशुतोषने सुद्धा नैराश्येतूनच हे पाऊल उचलले.  खरं तर त्याच्यावर उपचार सूरू होते त्यातून तो बाहेर … Read more

कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही!

मुंबई, दि. 11 ऑगस्ट राज्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही.कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ ५ रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील … Read more

EIA अधिसूचना मसुद्याचे पुनर्मुल्यांकन करा!

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना  विनंती मुंबई, दि. ११ – ऑगस्ट राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून पर्यावरण प्रभाव मूल्यांकन (environment impact assessment – ईआयए) अधिसूचनेच्या मसुद्याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. या मसुद्याचे पुनर्मुल्यांकन करण्याची त्यांनी विनंती केली आहे. सध्या अस्तित्त्वात … Read more

कोरोना मृत्यूदर 1% पेक्षा कमी आणण्याचे उदिष्ट !

प्रधानमंत्र्यांनी घेतला १० राज्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा. मुंबई, दि. ११ ऑगस्ट देशाच्या एकूण कोरोना रुग्णसंख्येपैकी ८० टक्के रुग्ण हे १० राज्यांमध्ये आहेत. या दहा राज्यांच्या प्रयत्नातून कोरोनाला हरविलं तर देश जिंकेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरू करणार … Read more

Western toilets (commode) मध्ये घाण करणा-यांना अभिनेत्रीने ‘असे’ फटकारले!

मुंबई,  दि. 11 ऑगस्ट सार्वजनिक शौचालय, स्वच्छतागृहच काय मुतारीचा वापर कसा केला जातो याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आलेला आहेच. शौचालयातला कार्यभार संपल्यानंतर पाणी टाकावे हे सुद्धा काही मंडळींना  जमत नाही. आपण वापरले की झालं, ही प्रवृत्ती तर असतेच पण सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगणं आपलं कामच नाही ही बेफिकिरी असते. हे फक्त सार्वजनिक ठिकाणीच होते असे … Read more

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग बनला श्रीवास्तव प्रा. लि.! 

  मुंबई – दि. ११  ऑगस्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची सल्लागार समिती जाहीर करण्यात आली आहे. अनुसूचित जातीच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी पाच जणांची समिती निवडण्यात आली. त्यामध्ये सदस्य सचिव कॅप्टन प्रभान्शु श्रीवास्तव यांच्यासह सदस्य म्हणून हर्ष श्रीवास्तव आणि पलश श्रीवास्तव यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या नावावर “श्रीवास्तव प्रायव्हेट लिमिटेड ” … Read more

अतिवृष्टी: महाराष्ट्राला लवकरात लवकर मदत करा!

पूरस्थितीसंदर्भात पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा. सर्व राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करा. मुंबई, दिनांक १०: ऑगस्ट महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि आसाम या सहा राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात अतिवृष्टीने झालेल्या … Read more

मोदीजी, कहां गये वो 20 लाख करोड ?

मोदी सरकारच्या 20 लाख कोटींच्या फसव्या पॅकेजचा युवक काँग्रेसकडून पर्दाफाश. दि. १० ऑगस्ट २०२० महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून *कहां गये वो 20 लाख करोड ?* हे राज्यव्यापी आंदोलन सुरु केले असून आज आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेताच्या बांधावर पोहचून शेतकऱ्यांना 20 लाख कोटींच्या पॅकेजमधून काही मिळाले का? याची … Read more

मराठा आरक्षणविरोधात षडयंत्र कोणाचे?

मराठा आरक्षणाविरोधात राजकीय षडयंत्र! अशोक चव्हाणांचा भाजपवर थेट आरोप. मुंबई, दि. १० ऑगस्ट २०२०: मराठा आरक्षण कायम राहू नये, यासाठी मोठे राजकीय षडयंत्र सुरू आहे. राज्य सरकारवर जाणीवपूर्वक धादांत खोटे आरोप केले जात आहेत. यावरून झालेल्या आंदोलनांचा बोलविता धनी वेगळा असून, ही आंदोलने भाजप पुरस्कृत असल्याचा थेट आरोप मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण … Read more