केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या.

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या. मुंबई, दि. ११ जून २६ :- शेतकऱ्यांच्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या आहेत व शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केली आहे. जयंतराव पाटील यांनी याबाबत एक पोस्ट सोशल मीडिया हँडलवरून शेअर केली आहे. त्यात … Read more

पिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा;

पिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा; मुंबई, दि. ११ जून २६: राज्यात मे व जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने आणि काटेकोरपणे पूर्ण करा. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसानभरपाईची प्रक्रिया गतीमान करा, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. वादळी … Read more

कुठे नेहरु आणि कुठे मोदी? मोदींचे योगदानच काय?

कुठे नेहरु आणि कुठे मोदी? मोदींचे योगदानच काय? मुंबई, दि. ११ जून २०२६.. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदावर राहण्याचा विक्रम करून पंडित जवाहलाल नेहरुंच्या पंतप्रधानपदापेक्षा जास्त काळ ते पदावर आहेत असा ढोल पिटला जात आहे परंतु नरेंद्र मोदी यांचे १२ वर्षातील कर्तृत्व व देशासाठी योगदान काय हे शोधावे लागेल. गेल्या १२ वर्षात नरेंद्र मोदी देशाला चुकीच्या … Read more

निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचे आंदोलन.

निवडणूक आयोगा विरोधात काँग्रेसचे आंदोलन. मुंबई, दि. ११ जून २०२६.. राज्यसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाच्या उमेवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर व मनमानीपणे रद्द करण्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज दादरमध्ये निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निवडणूक आयोग, … Read more

काँग्रेसचे साहेबराव कांबळे शिवसेनेत..

काँग्रेसचे साहेबराव कांबळे शिवसेनेत.. मुंबई, दि ८ जून २६ : विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासह उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील शेकडो पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत असल्याचा दावा यावेळी शिंदे यांनी … Read more

मान्सून कोकणात पण पेरणीची घाई करू नका..

मान्सून कोकणात पण पेरणीची घाई करू नका.. मुंबई, दि. ८ जून २६ : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. … Read more

ममता बॅनर्जींच्या TMC चे खासदारही फुटले.

ममता बॅनर्जींच्या TMC चे खासदारही फुटले.. कोलकाता, दि. ८ जून २०२०६. विधानसभेतील पराभवानंतर ममता बॅनर्जींना दुसरा मोठा धक्का बसत आहे. पश्चिम बंगालमधील विधिमंडळ पक्षाच्या विभाजनानंतर, आता टीएमसीच्या (TMC) संसदीय पक्षातही फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहून संसदेत स्वतंत्र बसण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. या … Read more

अर्थखाते NCP ला परत द्या

अर्थखाते NCP ला परत द्या मुंबई, दि. ८ जून २०२६. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्थ खाते परत देण्याची विनंती केली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी अर्थ खाते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्याची मागणी केली आहे. २८ … Read more

उमेदवारी मागे घेणाऱ्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी.

उमेदवारी मागे घेणाऱ्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी. मुंबई, दि. ६ जून २०२६. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेणारे यवतमाळ मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून अर्ज मागे घेतल्याने दोन्ही उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ … Read more

मुंबईची तुंबई झाली तर जबाबदारी भाजपाचीच.

मुंबईची तुंबई झाली तर जबाबदारी भाजपाचीच. मुंबई, दि. ६ जून .. मुंबईकरांना भ्रष्टाचारमुक्त शासन व स्वच्छ मुंबईचे आश्वासन देत महानगरपालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाने काही महिन्यातच त्यांचा खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली आहे. मे महिना संपून पावसाळा तोंडावर आला तरी नालेसफाईची कामे झालेली नाहीत. एका तुरळक पावसानेही पाणी तुंबल्याने बीएमसीतील भाजपा सरकार व मुंबई महापालिका प्रशासनाची … Read more