कोरोना : प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या!

पुणे, दि. १४ : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा (रक्तद्रव) उपचार पद्धती यशस्वी ठरत असल्याने अधिकाधिक व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. प्लाझ्मा दाते आणि प्लाझ्मा स्वीकृते यांच्या मध्ये समन्वय यासाठी मितेश घट्टे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा प्रयत्न करत आहे. यासाठी http://puneplasma.in हे ॲप विकसित करण्यात आले आहे. शासकीय निर्णय आणि … Read more

सोलापूर ग्रामीणमधून तब्बल ‘एवढे’ ई-पास मंजूर!

सोलापूर, दि. 14 ऑगस्ट लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्यांना आपल्या गावी जाण्यासाठी ई पास असावा लागतो.हा पास नसेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही. सोलापूरच्या ग्रामीण भागात अडकून पडलेल्या अशा तब्बल 1 लाख 97 हजार 45 नागरिकांना मागील साडेतीन महिन्यात ई-पास देण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) मोहिनी चव्हाण यांनी दिली. आजपर्यंत ग्रामीण भागात दोन लाख … Read more

‘त्या’अधिका-याच्या वारसाला तात्काळ 50 लाख!

कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची मदत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. प्रस्तावास तातडीने एका दिवसात मंजुरी. मुंबई, दि. १४ : कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी … Read more

नरेंद्र मोदींना ‘या’ प्रश्नाची भीती का वाटते?

दि. १४ ऑगस्ट २०२० पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी आज भाजप कार्यालयासमोर आंदोलन करत, मोदीजी, कहाँ गये वो 20 लाख करोड?  हा जाब विचारण्यात आला. मुंबईतील कार्यालयासमोर आंदोलनास जात असताना पोलिसांनी अध्यक्ष सत्यजीत तांबे व त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. कहां_गए_वो_२०_लाख_करोड ? या प्रश्नाची भाजप आणि पंतप्रधान … Read more

नरेंद्र मोदींची मध्यमवर्गाला मोठी भेट !

‘आयुष्यमान भारत’योजनेत मध्यमवर्गाचा सहभाग पाच लाख रुपयांचा विमा कव्हर मोफत. नवी दिल्ली, १४ ऑगस्ट नरेंद्र मोदी सरकारने मध्यमवर्गाला मोठी भेट दिली आहे. सरकारी आरोग्य विमा योजना ‘आयुष्यमान भारत’ची व्याप्ती वाढवत या योजनेत आता मध्यमवर्गाचाही समावेश करण्यात आला आहे. आजपर्यंत दारिद्र्य रेषेखालील, गरीब लोकांना या आरोग्य योजनेचा लाभ मिळत होता. परंतु या योजनेची व्याप्ती वाढवल्याने मध्यमवर्गाला सुद्धा ५ लाख … Read more

..अबकी बार, फ़ीर अजित पवार…?

वरिष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा विशेष लेख. मुंबई, दि. 14 ऑगस्ट २००४ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ८० वर्षाचे असताना त्यांचे मधले चिरंजीव जयदेव राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्याकाळी ही बातमी आज पार्थची झालीय त्यापेक्षाही प्रचंड मोठी झाली होती..जयदेव यांनी तशा मुलाखती दिल्या..पवार साहेबांकडे विकास दृष्टी आहे वगैरे.. शिवसेनेत काम का करत नाही असा प्रश्न … Read more

कोल्हापूरच्या महालक्ष्मीची आजची पूजा…

दि. 14 ऑगस्ट 2020 महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्रांचा विचार करताना कोल्हापूरच्या महालक्ष्मी अर्थात अंबाबाईला विशेष महत्त्व आहे. कोल्हापुरातील हे मंदिर ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्येही आढळतो.. या मंदिराला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. कोल्हापूर निवासिनी म्हणजेच करवीर निवासिनी महालक्ष्मी जगदंबा. दर मंगळवारी व शुक्रवारी तसेच नवरात्रात देवीचे दर्शन … Read more

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ!

मुंबई, दि. १४ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित विद्यापीठांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा तत्सम उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी सन २०२०–२१ या नवीन शैक्षणिक वर्षात लाभ मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दिलेली १४ ऑगस्टपर्यंतची मुदत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांनी वाढवून आता २८ ऑगस्टपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री … Read more

राष्ट्रवादीचे लक्ष्य नवी मुंबई महापालिका!

नवी मुंबई महानगरपालिकेत यश मिळवण्यासाठी तयार रहा – जयंत पाटील नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीची बैठक. प्रदेश कार्यालयात नवी मुंबई राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा जयंत पाटील यांनी घेतला आढावा. मुंबई दि. 14 ऑगस्ट नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपण तयारी सुरू केली तर यश आपल्या हातात येणार याबाबत माझ्या मनात शंका नाही. त्यामुळे एकत्रपणे या निवडणुकीत यश … Read more

विलासराव देशमुख सदैव स्मरणात राहतील!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली. मुंबई, दि. १४ ऑगस्ट हसतमुख, दिलदार, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते सदैव स्मरणात राहतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करुन आदरांजली वाहिली. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारे दूरदृष्टीचे नेते होते. संकटांवर मात करुन यशस्वी होण्याचे कौशल्य त्यांच्याकडे … Read more