आसावरीचा ‘बबड्या’ सुधारला हो !!

मुंबई, दि. २० ऑगस्ट २०२० अग्गंबाई, सासूबाई…..ही झी मराठीवरील सिरीयल तुमच्यापैकी अनेकजण पाहत असतीलच. या सिरीयलमधला ‘बबड्या’ मात्र सर्वांच्या डोक्यात गेला आहे. भोळी भाबडी आई आसावरीचा तो गैरफायदा घेऊन तीला प्रचंड मनस्ताप देतोच वरून  सुंदर, सुशिल, समजुतदार आणि हो नोकरी करणारी ‘शुभ्रा’ सारखी बायकी असूनही हा ‘बबड्या’ काही सुधरायला तयार नाही. या ‘कोंबडीच्या’ने घरातच नाही तर अख्या सोसायटीत नाव बदनाम करुन ठेवलंय. … Read more

‘स्वच्छ भारत’मध्ये महाराष्ट्रच एक नंबर!

स्वच्छ भारत अभियानाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम. मुंबई दि. २०  ऑगस्ट…. नागरी स्वछता अभियानातील कामगिरीत सातत्य राखत महाराष्ट्राने यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये देशातील सर्वाधिक पुरस्कार मिळवून आपली घोडदौड कायम राखली आहे, असे प्रतिपादन नगरविकासमंत्री एकनाश शिंदे यांनी केले. नागरी स्वच्छता अभियानातील राष्ट्रीय १२ पुरस्कारांपैकी सर्वाधिक ४ पुरस्कारांसह अन्य १३ असे एकूण १७ पुरस्कार … Read more

ITI प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ!

कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक यांची माहिती. मुंबई, दि. २० : ऑगस्ट… चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ही मुदत उद्या २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. त्यास आता मुदतवाढ … Read more

६५ वर्षावरील कलाकारांना शूटिंगची बंदी नाही..

मुंबई, दि. 20 ऑगस्ट.. चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. कोविड-19 पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु … Read more

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन!

मुंबई, दि. 20 ऑगस्ट. सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विज्ञानवादी, सुधारणावादी विचारांची चळवळ पुढे घेऊन जात अघोरी प्रथा व अंधश्रद्धांचं समाजातून समूळ उच्चाटन करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दाभोलकरांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

सर्व सरकारी नोकऱ्यांसाठी एकच CET !

मोदी सरकारचा मोठा निर्णय…. नवी दिल्ली, दि. 19 ऑगस्ट.. सरकारी नोकरीसाठी वेगवेगळ्या परीक्षा देण्याच्या कटकटीतून तरुणांची आता सुटका झाली आहे. मोदी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेत सरकारी नोकरीसाठी एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नोकरीसाठी वेगवेगळे अर्ज करा, वेगवेगळ्या परीक्षा द्या यातुन सुटका होणार आहे. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पोरांसाठी वेगवेगळ्या परीक्षा … Read more

भाजपशासित राज्यात दलितांवर वाढते हल्ले!

उत्तर प्रदेशातील हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटूंबियांची डॉ. नितीन राऊत घेणार भेट. मुंबई, दि. 19  ऑगस्ट… उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी … Read more

गणपती पावला! राज्यात ST बस सुरु!

परिवहन मंत्री, ॲड.अनिल परब यांची माहिती.. मुंबई (१९ ऑगस्ट) : कोरोना महामारीमुळे बंद करण्यात आलेली एसटी सेवा आता पुन्हा सुरू झाली आहे. टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि. २० ऑगस्टपासून सुरु होत असून, त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना दिलासा … Read more

मुंबईतील कोरोना परिस्थितीची श्वेतपत्रिका काढा!

मंगलप्रभात लोढांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली मनपा आयुक्तांची भेट. कोरोनाविषयक भ्रष्टाचाराची लोकप्रतिनिधींच्या समितीमार्फत चौकशी करा. मुंबई, दि. 19 ऑगस्ट 2020 : मुंबईतील कोरोना परिस्थितीबाबत तातडीने श्वेतपत्रिका जारी करावी तसेच कोरोनाविषयक भ्रष्टाचाराची लोकप्रतिनिधींच्या समितीमार्फत चौकशी करावी अशा मागण्या आज मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई मनपाचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केल्या. यावेळी खा.मनोज कोटक, भाजपा प्रवक्ते … Read more

आजी, माजी सैनिकांना ग्रामपंचायत मालमत्ता करमाफी!

ग्रामविकास विभागाचा महत्वपूर्ण निर्णय. मुंबई, दि. १९ : राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील शासन निर्णय ग्रामविकास विभागामार्फत काल निर्गमित करण्यात आला असून देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी … Read more