मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे आंदोलनाचे रणशिंग!

२६ जूनला ‘शहिदों को सलाम दिवस’; चीनप्रश्नी केंद्र सरकारला जाब विचारणार. पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात २९ जूनला आंदोलन मुंबई, दि. २५ जून २०२० केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन … Read more

तुम्हाला गुंतवणूक करायचीय ? मग सोन्यात गुंतवणुकीस चांगली संधी आहे!!

Gold Market

सोने ५० हजार रुपये तोळा, दिवाळीपर्यंत ८० हजारांवर? मुंबई, दि. २५ जून २०२० कोरोनाच्या संकटामुळे अख्खे जग चिंतेत असताना बाजारात सोन्याची झळाळी मात्र वाढतानाचे चित्र आहे. मुंबईच्या झव्हेरी बाजारात बुधवारी (२४ जून) ला २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८ हजार ५७५ रुपये तोळा होता. यात ३ टक्के जीएसटी अधिक केले तर एक तोळा सोन्यासाठी ५० हजार … Read more

महाराष्ट्रासाठी कोरोनासंदर्भातील गूड न्यूज !

राज्यात तिसऱ्यांदा विक्रमी संख्येने कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी ! कोरोनातून बरे होऊन घरी जाणाऱ्यांची बुधवारची संख्या ४१६१. मुंबई मंडळात आतापर्यंत ५० हजारांहून अधिक रुग्ण बरे. मुंबई, दि. २४ जून २०२० कोरोनाने मुंबईसह महाराष्ट्राची झोप उडवली असताना बुधवारचा दिवस काहीसा दिलासा देणारा ठरला. बुधवारी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची विक्रमी म्हणजे ४१६१ होती. एकाच दिवशी एवढ्या … Read more

कोरोना हॉटस्पॉट सोलापुरात मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्ट.

कोरोना हॉटस्पॉट सोलापुरात मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्ट. सोलापूर, दि. २४ जून २०२० मुंबई, ठाणे, पुणे नंतर सोलापुरात कोरोनाने थैमान मांडले असून सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये असलेला सोलापूर जिल्हा नंतर झपाट्याने कोरोनाच्या विखळ्यात सापडला. आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या २२९ वर गेली असून कोरोनारुग्ण संख्या २१८७ एवढी झाली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनही … Read more

मजूर सहकारी संस्थांच्या समस्यांवर नाना पटोलेंनी घेतली अधिकाऱ्यांची ‘शाळा’!

मुंबई दि. २४ जून २०२० मजूर सहकारी संस्थांना विनानिविदा काम वाटपाची तीन लक्ष रुपयापर्यंतची मर्यादा वाढविण्यात यावी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात सभासदांना मजूरीची रक्कम धनादेशाव्दारे वितरीत करणे अडचणीचे ठरत असल्याने यात बदल करण्यात यावा आणि केलेल्या कामांची रक्कम वर्षानुवर्षे प्रलंबित न ठेवता तातडीने अदा करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना विधानसभा अध्यक्ष नाना … Read more

ऐतिहासिक आंबडवे गावाला ‘वंचित’ची मदत!

ऐतिहासिक आंबडवे गावाला ‘वंचित’ची मदत! मुंबई, दि. २४  जून २०२० भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव म्हणजेच आंबडवे, हे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आहे. ऐतिहासिक असलेल्या या गावची परिस्थिती आज खूप वाईट आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असल्याने आज या गावकऱ्यांना मोठया प्रमाणावर मदतीची गरज आहे. मागासवर्गीयांची मते व सहानुभूती मिळविण्यासाठी आंबडवे हे … Read more

शहीद सुनील काळेंना शोकाकुल वातावरणात निरोप.

सोलापूर, दि. २४ जून २०२० अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आलेले सोलापूरचे जवान सुनिल काळे यांच्यावर बार्शी तालुक्यातील पानगाव येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरच्या पुलवामा भागात झालेल्या चकमकीत जवान सुनील काळे शहीद झाले. सुनिल काळे यांना पानगावसह आसपासच्या गावातील शेकडो लोकांनी जड अंतःकरणाने निरोप दिला. मंगळवारी पहाटे झालेल्या चकमकीत सुनिल काळे यांना वीरमरण आल्याची … Read more

तमाशा क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार यंदा गुलाबबाई संगमनेरकर यांना.

तमाशा क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार यंदा गुलाबबाई संगमनेरकर यांना. मुंबई, दि. २४ जून २०२० तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती गुलाबबाई संगमनेरकर यांना घोषित करण्यात आला आहे. तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या ज्येष्ठ कलाकारास राज्य शासनातर्फे या पुरस्काराने गौरविण्यात येते. २०१८-१९ साठीचा हा पुरस्कार असून ५ लाख रुपये, मानचिन्ह व … Read more

… हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे!: जयंत पाटील

मुंबई दि. २४ जून २०२० महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधी यांच्या विचारांचा विजय आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील … Read more

सदोष खते, बियाणे बनविणाऱ्या कंपनींवर कडक कारवाई व्हावी: नाना पटोले

नवी दिल्ली: दि. २४ जून २०२० शेतकरी सर्व बाजूने नाडला जात असताना बियाणे, खत कंपन्यांही बोगस माल पुरवून त्यांची फसवणूक करत आहेत. पण त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याचा असंतोष शेतकरीवर्गातून केला जात आहे. या प्रश्नी आता विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लक्ष घातले आहे. सदोष खते, बियाणे, कीटकनाशक बविणाऱ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपनींवर कडक कारवाई … Read more