महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिका-याच्या नियुक्ती प्रक्रियेवर काँग्रेसचे प्रश्नचिन्ह!

केंद्रीय निवडणूक आयोग दबावाखाली काम करत आहे का? मुंबई दि. ३१ जुलै २०२० महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सोशल मीडियाचे कंत्राट भाजपशी संबंधित कंपनीला दिले यामध्ये भाजप आणि निवडणूक आयोगाचा संबंध काय? या काँग्रेसने विचारलेल्या प्रश्नाला निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर हे पूर्णपणे असमाधानाकरक असल्याचे ठरवत काँग्रेस पक्षाने आता राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-याच्या नियुक्ती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह … Read more

कोविड रूग्णांना लुटणा-या खाजगी रूग्णालयांची खैर नाही!

सोलापूर, दि.31 जुलै  : खाजगी दवाखान्यांच्या बिलांबाबत सामान्य जनतेच्या तक्रारी येता कामा नयेत. खाजगी दवाखान्यातील बिले शासकीय नियमानुसार आहेत की नाहीत, याचे लेखा परीक्षण काळजीपूर्वक करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संबंधितांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात खाजगी दवाखान्यातील बिलाबाबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. … Read more

कोकणातील १२ काॅलेजला NCP कडून 100 संगणक!

मुंबई दि.३१ जुलै- पवारसाहेबांचा पहिला आग्रह हा नुकसान झालेल्या भागातील पीडितांना मदत देण्याचा असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या कोकणातील १२ महाविद्यालयात १०० संगणक आज वाटप करण्यात आले असून हा टप्पा इथेच संपत नसून पुढील काळात देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस वेल्फेअर ट्रस्टतर्फे अशी मदत केली जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील … Read more

राखी पाठवायची पण लाॅकडाऊन आहे ! Don’t worry आपले ‘पोस्ट’ आहे ना !

मुंबई, दि. 31 जुलै.. बहिण भावाच्या नात्याचा पवित्र सण रक्षाबंधन दोन तीन दिवसांवर आला आहे.  यावेळी लाॅकडाऊन मुळे या सणावरही विरझणच पडले आहे. परंतु यातुनही मार्ग काढत रक्षाबंधन साजरा करू शकता. पोस्टाने राखी जलदगतीने पाठवण्यासाठी विशेष सोय केली आहे. या सेवेचा फायदा घ्या आणि आपल्या लाडक्या भावाला पोस्टाने राखी पाठवा.. दरवर्षी राखी टपाल हाताळण्यासाठी टपाल … Read more

तापी नदीवरील खेडी भोकर पुलाचा प्रश्न लागला मार्गी!

पुलाच्या बांधकामास जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची तत्वतः मान्यता – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती मुंबई दि. 30 : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चोपडा- भोकर -जळगाव रस्ता राज्य मार्ग  40 या रस्त्यावरील खेडी भोकर पुलाच्या बांधकामास तत्वतः मान्यता मिळाली असून जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकी … Read more

भरमसाठ वीज बिलांविरोधात भाजप आक्रमक!

मुंबई, दि. 31  जुलै लॉकडाऊन काळात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीने केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी, लॉकडाऊन काळातील वीज बिले भरण्यासाठी ६ महिने मुदतवाढ द्यावी, या काळात १०० युनिटपर्यंतची वीज मोफत द्यावी आदी मागण्या करणारी याचिका भाजपाचे माजी खासदार डॉ. किरीट सोमैय्या आणि ठाणे शहर भाजपा अध्यक्ष आ. निरंजन डावखरे यांनी राज्य विद्युत नियामक आयोगापुढे दाखल … Read more

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करावे!

मुंबई दि. 31 जुलै – सदोष व निकृष्ट बियाणे, खते आणि पिकविमा यासंदर्भातील प्रश्नांना शेतकऱ्यांना दरवर्षी सामोरे जावे लागते. यासाठी भारतीय संविधानातील 323 बी (2) (जी) प्रमाणे न्यायाधिकरण स्थापन करता येईल. असे न्यायाधिकरण स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य ठरेल. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकारण प्राधान्याने करता येईल. अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी … Read more

अकोल्यातील हॉटेल-रेस्टॉरंट मालकांचा लॉकडाउनला विरोध!

अकोला दि. ३१ – शासनाने ३१ जुलै नंतर लॉक डाऊन वाढविला तर वंचित बहुजन आघाडी त्याला विरोध करेल, असे ऍड प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केल्यानंतर अनेक संघटना पुढे येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवसायांना याचा फटका बसलेला आहे. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायाला तर याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायीक आर्थिक संकटात आले असून … Read more

31 ऑगस्टपर्यंतच्या लाॅकडाऊनमध्ये काय सूरू असणार?

मिशन बिगिन अगेन’चा पुढचा टप्पा नियमावली जाहीर मुंबई, दि. 30 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.  काही सवलतींमध्ये वाढ करत राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्सेस काही अटींच्या अधीन राहून 5 ऑगस्ट 2020 पासून … Read more

पुण्यातील कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणेतील समन्वय महत्त्वाचा; मृत्यूदर रोखण्यासोबतच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्या. पुणे, दि. 30: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यंत्रणातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगतानाच क्वारंटाईन सुविधांचे नेटके व्यवस्थापन करण्यासोबतच ट्रॅकींग आणि टेस्टींगही मोठ्या प्रमाणात कराव्यात. मृत्यूदर रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे … Read more