Ads

--

ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे BMC च्या ठेवी घटल्या

By Xtralarge News

January 15, 2024 8:59 pm

Ads

मुंबई दि. १५ जानेवारी :

ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील बिल्डरांना केलेला 50% प्रिमियम माफीमुळे मुंबई महापालिकेच्या ठेवींमध्ये घट झाली, असा आरोप मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड अशी शेलार यांनी  केला.

महायुतीतर्फे मुंबई उपनगराचा मेळावा रंग शारदा सभागृहात तर शहर विभागाचा मेळावा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पार पडला. यावेळी केलेल्या भाषणामध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड शेलार यांनी उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला. तत्कालीन पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार कुठे भेटतील का? म्हणून वरळीतील लोक त्यांना शोधत आहेत. वरळीतून आमदार गायब, अशी स्थिती आहे. यांचे विमान कधी जमिनीवर येतच नाही, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेतला जोरदार टीका केली.

मुंबई महापालिकेची डिपॉझिट कमी झाली म्हणून आता ओरडत आहेत, शिंदे सरकार आल्यानंतर विकास कामे सुरू झाली, विकास कामांना निधी वापरला गेला, त्यामुळे मालमत्तांमध्ये साडेचौदा टक्के वाढ झाली. पुल उभे राहिले, रस्ते उभे राहिले, डिपॉझिट कमी होण्याचे खरे कारण तत्कालीन ठाकरे सरकारने बिल्डरांवर 50% प्रीमियम माप ची खैरात केली त्यामुळे महापालिकेतील तिजोरीत येणारा निधी आला नाही आणि त्यामुळेच महापालिकेच्या ठेवी कमी झाल्या, असा आरोपी आमदार अशी शेलार यांनी केला.

 

उपस्थितांना आव्हान करताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, सकाळी नऊ वाजता टीव्ही बघू नका! पत्रकार पोपटलाल बोलत राहतील, छत्री घेऊन फिरतात, कधी मान अशी, कधी हात असा, बाकी काही नाही.. राज्याला देण्यासारखं काही नाही..या पत्रकार पोपटलाल आणि कंपनीने मुंबईचे केलं तेवढं नुकसान अन्य कोणीच केले नाही, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोळ केला. दोन्ही मेळाव्याला महायुतीच्या सर्व पक्षांचे आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

No comments to show.

Leave a Comment