पंतप्रधान मोदींच्या कामावर तरुणाईचा विश्वास..

0
IMG-20240227-WA0080

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी;

विकसित भारताचे आपले स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे काम तरुणाई करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर भारताच्या युवा शक्तीचा प्रचंड विश्वास आहे असे प्रतिपादन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी आज येथे केले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माटुंगा येथे आयोजित नमो युवा चौपाल कार्यक्रमात ते बोलत होते. भाजयुमो मुंबई अध्यक्ष तजिंदर सिंह तिवाना यांच्या पुढाकाराने अभियान यशस्वी करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत देश विकसित भारत बनवण्याचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारतासाठी देशाची दिशा काय असेल हे देशातील तरुणाईच ठरवणार आहे. नमो युवा चौपाल आणि नमो वॉरियर्स अभियानाच्या माध्यमातून हजारो तरुणांना जोडण्याचे काम होत आहे असेही मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *