Ads

--

शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका.

By Xtralarge News

June 2, 2021 12:21 pm

Ads

शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका.

पोलिसांनी बेदम मारहाण केलेल्या गेवराईच्या शेतकऱ्याची आमदार आशिष शेलारांनी घेतली भेट.

गेवराई, दि. 2 जून :

कोरोनाचे नियम पाळून खत व बियाणे खरेदी करण्यासाठी गेलेल्या गेवराई, किनगावचे शेतकरी मोतीराम चाळक यांना पोलीसांनी बेदम मारले. बीड दौऱ्यावर असणाऱ्या भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आज या शेतकरी बांधवाची भेट घेतली. त्यांच्यावर झालेला अन्याय मंत्रालयापर्यंत पोहचवू, अशी ग्वाही दिली. संबंधित पोलिसांवर कारवाई करा, अशी मागणी आम्ही गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे करु असेही आश्वस्त केले.

लाॅकडाऊनचे नियम आम्ही पाळतो. सकाळी 11 पर्यंत बी बियाणे खरेदी करण्यासाठी आम्ही जातो तर पोलीस आम्हाला मारतात, मग बियाणे आणि खते शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने बांधावर आणून द्यावे. जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका, असा टाहो ठाकरे सरकारच्या नावाने शेतकरी फोडतो आहे.
मराठा आरक्षणाबाबत पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी भाजपा नेते आमदार आशिष शेलार चार दिवसाच्या बीड आणि नांदेड दौऱ्यावर आहेत. आज बीड येथून या दौऱ्याला सुरुवात झाली

No comments to show.

Leave a Comment