Ads

--

भारतात सहा महिन्यात 5G सेवा !

By Xtralarge News

December 9, 2020 10:50 am

Ads

भारतात सहा महिन्यात 5G सेवा!

मुकेश अंबानी यांची घोषणा.

नवी दिल्ली, दि. 9 डिसेंबर:
मोबाईल क्षेत्रात मागील काही वर्षात क्रांतीकारी बदल झाले असून स्मार्ट फोन वापरण्याची संख्या झपाट्याने वाढत आहे. 4 G तंत्रज्ञानामुळे इंटरनेट चा स्पीड व कमी किंमतीत ते उपलब्ध झाल्यानेही या क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. आता पुढचा टप्पा 5 G चा आहे. आणि पुढील सहा महिन्यात देशात 5 G सेवा सुरू होईल अशी घोषणा रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी केली आहे .

२०२१ या वर्षात रिलायन्स जिओ देशात ५ जी ची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल. जिओद्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहोत, असे मुकेश अंबानी म्हणाले.

सरकारला ५ जी स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवेत. देशातील ५ जी सेवांच्या बदलांमध्ये जिओ पुढाकार घेईल. आपण सेमी कन्डक्टरसाठी केवळ आयातीच्या भरवशावर राहू शकत नसल्याचंही ते म्हणाले.

देशात सध्या ३० कोटींपेक्षा अधिक २ जी सेवा वापरणारे ग्राहक आहेत. या लोकांपर्यंत स्मार्टफोन्स पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी काही धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत. डिजिटली आपण उत्तमरित्या जोडले गेलो आहोत.

5 G मुळे इंटरनेट स्पीड प्रचंड मिळणार आहे. तीन तासाचा चित्रपट काही सेकंदात डाऊनलोड होऊ शकतो. याचा स्पीड 200 mbps असेल. या नव्या तंत्रज्ञानामुळे मोबाईल क्षेत्रात मोठी क्रांती होईल.

 

No comments to show.

Leave a Comment