Ads

--

बीड प्रकरणी आवाज उठवणा-यांना संरक्षण द्या!

By Xtralarge News

January 6, 2025 5:53 pm

Ads

बीड प्रकरणी आवाज उठवणा-यांना संरक्षण द्या!

मुंबई, दि. ६ जानेवारी ;
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येचा पाठपुरावा करणा-या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन या लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात शरद पवार पुढे लिहितात की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण हत्या केली. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे. त्यामुळे, या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे निदर्शनास येते.

बीड- परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत, एकंदर परिस्थिती पाहता या लोकप्रतिधींच्याही जिवाला धोका होऊ शकतो हे लक्षात घेऊन सुरक्षा द्यावी असे पवार म्हणतात.

No comments to show.

Leave a Comment