Ads

--

मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण?

By Xtralarge News

February 25, 2024 11:49 pm

Ads

नागपूर, दि. २५ फेब्रुवारी:

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्राला लावलेले गालबोट आहे. जातीवरून टीका करतानाच त्यांनी अर्वाच्च भाषेचा वापर केला, हे महाराष्ट्र व भाजपा सहन नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

नागपूर येथे माध्यमांना त्यांनी प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत त्यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले व ते उच्च न्यायालयात टिकविले. मनोज जरांगे यांचा जीव वाचायला हवा आणि त्यांना सुरक्षा देण्याचे काम फडणवीस यांनी केले. त्यांच्यासारख्या निष्कलंक माणसावर आरोप करणे हा महाराष्ट्रासाठी वाईट दिवस आहे.

जरांगे सागर बंगल्यावर जात आहेत; यात फडणवीसांची काय चुक आहे. ज्यांनी ४० वर्षे मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात आरक्षण घालविले, अशा शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर जाऊन प्रश्न विचारायला हवा. फडणवीसांवर केलेले असे वक्तव्य मराठा समाजाला मान्य नाही आणि महाराष्ट्रातील जनतेला देखील मान्य नाही. देवेंद्र फडणवीस आमचे नेतृत्त्व आहे त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

 

No comments to show.

Leave a Comment