पण मोदींचा मेहुलभाई देशातून पळालाच कसा ?

0
20210603_105549

पण मोदींचा मेहुलभाई देशातून पळालाच कसा ?

मुंबई दि. ३ जून :
पंतप्रधान नरेंद्र मोदी मेहुलभाई…मेहुलभाई बोलत होते. मग मेहुलभाई देशातून पळाला कसा?अशी खोचक विचारणा करतानाच जेवढी तत्परता आणण्यासाठी दाखवताय तेवढीच तत्परता मेहुलभाई पळून जाताना का दाखवण्यात आली नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला केला आहे.

मेहुल चोक्सी यांना भारतात आणताय चांगली बातमी आहे. परंतु दोन तीन दिवस मेहुल चोक्सी यांना आणण्याचा जोरदार प्रचारही केंद्रसरकारकडून केला जातोय याबाबत नवाब मलिक यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

मेहुल चोक्सी यांना आणताय ठिक आहे परंतु नीरव मोदी…विजय मल्ल्या…सुशील मोदी यांना कधी आणणार आहात. जनतेचा पैसा बुडवून देशातून पळून जाणार्‍यांची मोठी तुकडी कार्यरत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

मेहुल चोक्सीला आणण्याचा प्रश्न नाही तर तो पळाला कसा हा खरा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे आणि जनता आता उपस्थित करत आहे. देशातील जनतेचा पैसा बुडवून पळत असताना का तत्परता मोदींनी दाखवली नाही असा प्रश्न आजही जनतेच्या मनात जिवंत असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *