Ads

-

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट..

By Xtralarge News

June 20, 2026 4:49 pm

Ads

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट..

नागपूर, दि. २० जून :

महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे.एल-निनोच्या प्रभावामुळे पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. धरणांमधील घटता पाणीसाठा, मराठवाड्यासह अनेक भागांतील दुष्काळी स्थिती आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून आपला कृती आराखडा जाहीर करावा,अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास राज्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने वेळ वाया न घालवता ठोस नियोजन आणि उपाययोजना कराव्यात अस वडेट्टीवार म्हणाले. देशात विरोधी पक्ष संपवण्याचे आणि एकपक्षीय व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाही संस्थांवर दबाव आणून विरोधी पक्ष कमकुवत करण्याचे राजकारण सुरू असून याबाबत देशातील जनतेने सतर्क राहण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील राजकारण सतत बदलत असते. पक्षात येण्या-जाण्याची प्रक्रिया सुरू राहते, मात्र कोणताही पक्ष किंवा विचार सहजपणे संपवता येत नाही. ठाकरे आपल्या पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी निश्चितपणे प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार आणि कायदा-सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. नागपूरसह राज्यातील अनेक भागांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप करत या सर्व प्रश्नांवर पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा गटनेता बदलण्यात आला,यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणले, गटनेता निवडीचे काम पक्षाच्या पत्रानुसार होत असते. पक्षाला जो निर्णय घ्यायचा आहे,तो पक्षश्रेष्ठी घेतील. याबाबत काही अधिक बोलायचं नाही अशी भूमिका वडेट्टीवार यांनी स्पष्ट केली.

No comments to show.

Leave a Comment