BDD चाळ पुनर्विकासातील ८६४ सदनिकांचे वितरण.
मुंबई, दि. १७ मार्च :-
मुंबईतील नायगाव बिडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलातील ८६४ सदनिकांचा वितरण समारंभ पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सदनिकाधारकांना चाव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
बीडीडी चाळीत राहणारे सर्वजण आता टॉवरमध्ये राहणार आहेत, एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर चाव्या घेताना पहिला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. अनेकांचे नवीन घरात जाण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे याचा मला विशेष आनंद आहे. या प्रकल्पाला सुरुवात झाली, त्यानंतर मधल्या काळात सरकार बदलले, त्यामुळे काही स्पीडबेकर मध्ये आले. घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि स्वप्नपूर्तीचा जो आनंद असतो तो सगळ्यात जास्त असतो, आज ते स्वप्न बीडीडीवासियांचा पूर्ण होते आहे याचा मला विशेष आनंद वाटत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
घर हा कुटुंबाच्या सुख समाधानाचा, आत्म सन्मानाचा सुख समृद्धीचा पाया आहे. बीडीडी चाळीना अनेक वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. या चाळीनी स्वातंत्र्याचा लढा अनुभवला आहे, गिरण्यांचा सुवर्णकाळाच्या त्या साक्षीदार आहेत, कामगार चळवळ, दलीत पँथर चळवळ अशा अनेक चळवळी पहिल्या आहेत. पिढ्यानपिढ्या या चाळीत राहणाऱ्यांचे सामाजिक आणि संस्कृतिक ऋणानुबंध या वास्तुशी जोडले गेले आहेत.
तीन ते चार पिढ्या आपल्या या चाळीत गेल्या. १५० ते १६० फुटांच्या चाळीत आयुष्य काढणे किती अवघड असते हे आम्हाला चांगले माहीत आहे. त्यामुळेच सर्वसामान्य माणसावर चांगले दिवस आले पाहिजे, त्याला चांगले आणि त्यांच्या हक्काचे घर मिळायला हवे हीच महायुती सरकारची भूमिका असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
ही घरे एवढ्या लवकर मिळतील यावर अनेकांचा विश्वास बसणे कठीण आहे. मात्र स्थानिक आमदारांनी वेळोवेळी त्यासाठी पाठपुरावा केला. माझ्याकडे तर अनेक आमदार थेट फाइल घेऊन यायचे लोकांना फायदा होणार असेल तर मी तत्काळ त्यावर सही करत असे..
विश्वासाचे दुसरे नाव ‘ म्हाडा ‘ झाले आहे. अशा कामातून प्राधिकरणाची एक चांगली प्रतिमा तयार झाली असून ती आपण सर्वांनी मिळून जपली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. या प्रकल्पात पोलिसांना देखील आपण घरे दिली आहेत. आधी लग्न करताना विचारायचे मुंबईत राहायला स्वतःचे घर आहे का..? आता ते सांगतील होय २ बीएचके घर आहे. या प्रकल्पात भवानी मातेचे मंदिर बांधण्याची तसेच पार्किंगचा विषय सोडवण्याची मागणी पुढे आली असून त्याबाबत नक्की सकारात्मक निर्णय घेतले जातील असे यावेळी सांगितले.
खरे तर यंदाच्या अर्थसंकल्पात आर्थिक शिस्त लावण्यासाठी कठोर निर्णय घेतले जाईल असे वाटले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी तशाही परिस्थितीत शेतकऱ्याचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्यांना खरे तर राज्याचा अर्थव्यवस्थेची नाडी अचूक माहिती आहे मात्र तरीही त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला याबद्दल त्यांचे शिंदे यांनी विशेषत्वाने कौतुक केले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री पंकज भोयर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर रितू तावडे, आमदार प्रा. मनिषा कायंदे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार चित्रा वाघ, माजी आमदार सदा सरवणकर, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल, मिलिंद बोरीकर आणि मिलिंद शंभरकर, शिवसेनेचे सह – मुख्य प्रवक्ते राजू वाघमारे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
Leave a Comment