राहुल गांधींनी फोडला मतचोरीचा आणखी एक बॉम्ब..

0
20250918_141307

राहुल गांधींनी फोडला मतचोरीचा आणखी एक बॉम्ब..

मुंबई,  दि. १८ सप्टेंबर २५ ;

राहुल गांधी आज आणखी एक मोठा बाॅम्ब टाकत मतचोरीचा भांडाफोड केला. कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदार संघ तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्य़ातील राजुरा मतदारसंघातील मतचोरीचा पर्दाफाश केला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे मतचोरांना पाठीशी घालत आहेत पण मतचोरी वाचणार नाही असा इशारा काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला.

राहुल गांधी धमाकेदार प्रेझेंटेशन देत निवडणूक आयोगाची लक्तरे च काढली. ते म्हणाले की, कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदार संघात ६३०० मतदार डिलीट करण्यात आले. ⁠गोदाबाई यांच्या मोबाईल नंबर वरून १२ मते डिलीट झाली. पण गोदाबाई यांना त्याची माहितीच नाही. डिलीट रिक्वेस्ट टाकण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व मोबाईल नंबर्स हे कर्नाटकच्या बाहेरचे आहेत.  ⁠सूर्यकांत यांच्या मोबाईल नंबर वरून १२ मते डिलीट करण्यात आले, ते स्वतः प्रेसला उपस्थित राहून त्यांनी अशी कोणतीच प्रक्रिया केली नसल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील राजोरा मतदार संघात ६८५० मत याच प्रक्रियेच्या माध्यमातून ६८५० वोटस डिलीट करण्यात आली. हे सर्व काँग्रेस सपोर्टर बूथ होते. वोटर लिस्ट मध्ये पहिल्या नंबरवर जे नाव आहे तो व्यक्ती ही मते डिलीट करण्यासाठी वापरले . ही प्रक्रिया सॉफ्टवेयर द्वारे करण्यात येत आहे. ही सर्व प्रक्रिया केंद्रीकृत पद्धतीने सुरू आहे. ही सर्व एकाच कॉल सेंटर च्या माध्यमातून सुरू आहे.

राहुल गांधी पुढे असेही म्हणाले की, कर्नाटक CID ने मागील १८ महिन्यात १८ पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहून वोटचोरी साठी वापरण्यात आलेले मोबाईल नंबर, त्यांचे आय पी एड्रेस, लोकेशन, ओटीपी अशी सर्व माहिती मागितली. सप्टेंबर २०२५ म्हणजे याच महिन्यात शेवटचे पत्र पाठवण्यात आले आहे. ECI ही माहिती देत नाही. इलेक्शन कमिशन, आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ही सर्व माहिती आहे. ही माहिती लपवून ते वोट चोरी गँग ला प्रोटेक्ट करीत आहेत, पाठीशी घालत आहेत.

ज्ञानेश कुमार यांनी कर्नाटक CID ला एक आठवड्यात ही सर्व माहिती द्यावी अन्यथा तुम्ही भारतीय लोकशाहीचा खून पाडण्यास भागीदार आहेत हे सिद्ध होईल. निवडणूक आयोगाच्या आतूनच आता आम्हाला माहिती मिळत आहे ही समाधानाची बाब आहे. आता हे थांबणार नाही. भारतीय लोक, जनता, मतदार ही वोट चोरी आणि लोकशाहीची हत्या कदापी सहन करणार नाही. ये तो सिर्फ झाकी हे, हाइड्रोजन बॉम अभी बाक़ी है असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *