Tuesday, May 13, 2025
Home ताज्या बातम्या शासनाकडे जमा जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत

शासनाकडे जमा जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत

शासनाकडे जमा जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत..

मुंबई, दि. २ जानेवारी २०२५ :

शेतसारा अथवा महसुली देणी देवू शकले नाहीत अशा शेतकऱ्यांच्या सरकारने जप्त केलेल्या जमिनी, ज्याला आकारी पड जमिनी म्हणतात त्या पुन्हा त्याच शेतकऱ्यांच्या नावावर करण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय  महायुती सरकारने घेतला. या निर्णयामुळे राज्यातील ९६३ शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला. ही जमीन रेडीरेकनर दराच्या २५ टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना परत घेता येईल.

जप्त असलेल्या या जमिनी वर्ग दोनच्या असून त्यांचा ताबा जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. या जमिनींच्या संदर्भात देय आकाराच्या रकमा व त्यावरील व्याज यांच्या वसुलीसाठी १२ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर जमिनींचा लिलाव करण्यात येतो. लिलावाच्या रकमेतून शासनाचे येणे वसूल केले जाते आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना परत केली जाते. ही उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी शासनाला द्यायच्या रकमेपेक्षा खूप जास्त असते. शासनाला मिळणाऱ्या अल्परकमेसाठी शेतकऱ्यांची जमीन वर्षानुवर्षे शासनाकडे पडून राहण्यापेक्षा रेडीरेकनर दराच्या २५ टक्के रक्कम भरून शेतकऱ्यांना परत मिळावी यासाठी हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. या जमिनी वर्ग एकमध्ये आणून ज्या शेतकऱ्यांच्या होत्या त्यांच्याच नावे करता येतील. यासाठी राज्य सरकार कायद्यात सुधारणा करणार आहे.

 

या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकारांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील ९६३ शेतकऱ्यांच्या चार हजार ९४९ हेक्टर आर जमिनी शासन जमा झाल्या होत्या. शेतसारा न भरल्यामुळे या जमिनी संबंधित तहसीलदारांनी शासनाकडे जमा केल्या होत्या. आज मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण ९६३ शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. रेडीरेकनर दराच्या २५ टक्के रक्कम भरून ही जमीन पुन्हा नावावर केली जाईल.

महसूल विभागाचा मंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी आजचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. आता कायद्यात सुधारणा होतील. माझी सुरूवातच माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्याने झाली, याचा मला आनंद आहे. दुष्काळ अथवा अनेक अडचणींनी ज्या शेतकऱ्यांनी सरकारला महसूल दिला नाही, त्यामुळे या जमिनी सरकारने ताब्यात घेतल्या होत्या. किमान पन्नास वर्षांपासून याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. आज शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

 

RELATED ARTICLES

दहावीचा निकाल ९४.१० टक्के : 

दहावीचा निकाल ९४.१० टक्के : मुंबई दि. १३ मे २५ ; महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत....

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी मोहन जोशी.

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी मोहन जोशी. मुंबई, दि. १३ मे २५  : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी...

GST विभागातून करदात्याच्या गोपनीय माहितीची गळती.

GST विभागातून करदात्याच्या गोपनीय माहितीची गळती. मुंबई, दि. १३ मे २५ ; जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

दहावीचा निकाल ९४.१० टक्के : 

दहावीचा निकाल ९४.१० टक्के : मुंबई दि. १३ मे २५ ; महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले आहेत....

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी मोहन जोशी.

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी मोहन जोशी. मुंबई, दि. १३ मे २५  : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी...

GST विभागातून करदात्याच्या गोपनीय माहितीची गळती.

GST विभागातून करदात्याच्या गोपनीय माहितीची गळती. मुंबई, दि. १३ मे २५ ; जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई...

एसटीत लवकरच नोकरभरती..

एसटीत लवकरच नोकरभरती.. मुंबई दि. १२ मे २५ ; एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेत आहोत. या बसेस चालविण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची...

Recent Comments