Ads

--

…. माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली !

By Xtralarge News

August 2, 2022 12:21 pm

Ads

…. माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली !

मुंबई, दि. 2 ऑगस्ट:
मुंबई बद्दल वादग्रस्त विधान करून रोष पत्करून घेतल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नरमले.
सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रीया उमटताच त्यांनी चूक झाल्याचे कबुल केले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच राज्यपाल यांना आपली चूक झाल्याचे जाहीरपणे कबुल करावे लागण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे

राजभवनने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली.

महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे.  विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.

गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.

महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल असा विश्वास बाळगतो.

No comments to show.

Leave a Comment