आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक !

आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक : मुंबई, दि. १५ डिसेंबर: आरक्षणांबाबत केंद्र सरकारने नेहमीच नकारात्मक भूमिका घेतली असून, त्यामुळेच मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणालाही धक्का लागल्याची टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय निराशाजनक आहे. … Read more

ओबीसांचा डेटा गोळा करण्यास टाळाटाळ केली तर तीव्र आंदोलन !

ओबीसांचा डेटा गोळा करण्यास टाळाटाळ केली तर तीव्र आंदोलन ! मुंबई, दि. १५ डिसेंबर : महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्याचे टाळल्यामुळे ओबीसी समाजाचे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण गेले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी सरकारकडे कोणतीही सबब उरलेली नसून या सरकारने डेटा गोळा करण्यात अजूनही टाळाटाळ केली तर भारतीय जनता … Read more

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गेले!

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षण गेले! मुंबई, दि. १५ डिसेंबर: राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या जागांवर पाणी सोडावं लागत आहे. आता पाच जिल्हा परिषदा गेल्या आता आणखी दोन जिल्हा परिषदा आणि १०५ नगरपंचायती इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसींच्या जागांना फटका बसतोय. यापुढे तरी किमान तीन महिन्यांमध्ये डेटा गोळा करण्याचे काम पूर्ण करा व त्यानंतरच इतर निवडणुका राज्य … Read more

ओबीसी आरक्षणाशिवाय पंचायत निवडणुका !

ओबीसी आरक्षणाशिवाय पंचायत निवडणुका ! सुप्रीम कोर्टाचा ठाकरे सरकारला मोठा झटका. नवी दिल्ली, दि. १५ डिसेंबर : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला जोरदार झटका दिला आहे. केंद्र सरकारकडून इम्पेरिकल डेटाची मागणी करणारी महाराष्ट्र सरकारची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. ओबीसांच्या २७ % जागाही खुल्या वर्गासाठी जाहीर करुन निवडणुकीची अधिसूचना काढा असे आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार … Read more

अजय मिश्रा टेनीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा

अजय मिश्रा टेनीवर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा.. मुंबई दि. १५ डिसेंबर : पत्रकारांना धमकी देणार्‍या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. लखीमपूर घटना ही सुनियोजित कट होता असे एसआयटीने म्हटले असून या … Read more

ओमायक्रॉनच्या संकटकाळात नेतृत्वाच्या अभावामुळे सरकार भरकटले

ओमायक्रॉनच्या संकटकाळात नेतृत्वाच्या अभावामुळे सरकार भरकटले.. मुंबई, दि. 15 डिसेंबर : कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा शिरकाव भारतात झाल्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातच त्याचा फैलाव वेगाने वाढत असल्याचे निष्पन्न होत असून देशातील सर्वाधिक ओमयक्रॉन रुग्ण महाराष्ट्रात असल्याने या फैलावापासून बचावासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, याची माहिती राज्य सरकारने जनतेस दिली पाहिजे अशी मागणी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव … Read more

शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडण्याचा भाजपाचा हिन राजकीय प्रयत्न

शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडण्याचा भाजपाचा हिन राजकीय प्रयत्न: मुंबई, दि. १५ डिसेंबर : भारतीय जनता पक्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी करुन शिवरायांचा अवमान करत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरायांना हिंदू व्होट बँकेशी जोडून नरेंद्र मोदींनी त्यावर कळस केला अशी तुलना करण्याची केलेली हिम्मत हे त्यांच्या ‘छिंद्म’ प्रवृत्तीचे … Read more

कोरेगाव भीमा विजय स्तंभाच्या सुशोभीकरणासाठी 100 कोटींचा आराखडा बनवा !

कोरेगाव भीमा विजय स्तंभाच्या सुशोभीकरणासाठी 100 कोटींचा आराखडा बनवा ! मुंबई, दि. 15 डिसेंबर : शौर्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजय स्तंभाच्या विकास व सुशोभीकरणासाठी 100 कोटी रुपयांचा बृहत् विकास आराखडा तयार करून मान्यतेसाठी एक महिन्याच्या आत सादर करावा, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. सामाजिक न्यायमंत्री … Read more

मुंबई महानगरपालिकेत करोडो रुपयांचा कोविड घोटाळा!

मुंबई महानगरपालिकेत करोडो रुपयांचा कोविड घोटाळा! बीएमसी अधिका-याच्या वडिलांना 100 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट. मुंबई, दि. १४ डिसेंबर : कोविडच्या नावाने मेडिकल इमर्जन्सीच्या अधिकाराचा राक्षसी भ्रष्ट वापर याचे जगातले सगळ्यात मोठं उदाहरण मुंबई महानगरपालिका आहे असे भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांनी सांगितले. मुंबई महानगर पालिकेचे वॉर्ड अधिकारी सहाय्यक आयुक्त मनिष राधाकृष्ण वळंजू यांनी १०० कोटींचे कॉन्ट्रॅक्ट … Read more

सीमाभागातील मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपा गप्प का ?

सीमाभागातील मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपा गप्प का ? मुंबई, दि. १४ डिसेंबर : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. सीमा भागात मराठी बांधवांची गळचेपी केली जात असताना कर्नाटकातील भाजपाचे सरकार बघ्याची भूमिका घेत असून मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या एकाही … Read more