मविआच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर

0
IMG_20210625_203753

मविआच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर

मुंबई दि. ३० ऑगस्ट :
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी ईडीचा वापर होतो आहे. निव्वळ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनाच नव्हे तर देशातील भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्यांना त्रास देणे व त्यांच्या त्रुटी असतील तर त्या हुडकून काढण्याचा प्रयत्न यंत्रणा करताना दिसत आहेत. ज्यांना नोटीसा आल्या आहेत ते नेते सडेतोड उत्तर देतील पण सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांच्याबाबतीत एक नंबर कोण हे वाझे व इतरांच्या जवाबात सिद्ध झाले आहे. अनिल देशमुख यांचा या केसमध्ये संबंध नाही हे पुन्हा उघड झाले आहे. शिवाय अनिल परब यांच्याविरोधात वेगवेगळ्या पध्दतीने दबाव आणून स्टेटमेंट घेतले जातेय हे चुकीचे काम सुरू आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे, त्यावरून राजकारण ताडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *