महिला व बाल कल्याण विभागात कंत्राटी नोकर भरती…

0
FB_IMG_1688313407909

मुंबई, दि. ३१ ऑगस्ट :-

सरकार मागच्या दाराने खासगीकरण आणत असून लाडक्या कंत्राटदारांसाठी सरकार बेरोजगारांच्या रोजगारावर गदा आणत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या एक्स हँडलवरून शासनाच्या महिला व बाल विकास विभागाचा शासन आदेश प्रसारित केला आहे. त्याबद्दल ते म्हणतात की शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने काल ३० ऑगस्ट रोजी एक शासन आदेश काढला आहे. त्यानुसार विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील २०६३ पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ११४५ पदे भरण्याचे कंत्राट पुण्यातील ज्या Bricks India Pvt. Ltd कंपनीला दिले आहे, याच कंत्राटदाराला वैद्यकीय शिक्षण विभागाचे कंत्राटी पद भरतीचे काम देखील नियम डावलून दिले आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ही कंपनी कोणाची आहे? हा कंत्राटदार कोणाचा ‘लाडका’ आहे? याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळाले पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे

या शासन आदेशाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले की, सरकार मागच्या दाराने खासगीकरण करीत आहे असे ते म्हणाले तसेच राज्यातील बेरोजगार व्यक्तींच्या कायमस्वरूपी रोजगारावर लाडक्या कंत्राटदारांसाठी गदा आणली जात आहे. आमचे अगोदर पासून म्हणणे आहे की, हे सरकार गोरगरीब, शेतमजूर, सामान्य जनतेचे नसून बिल्डर आणि कंत्राटदारांचे देशातील आतापर्यंतचे सर्वात भ्रष्ट सरकार आहे अशी टीका त्यांनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *