गायरान जमीन प्रकरणी अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्या…

0
20221226_201741

गायरान जमीन प्रकरणी अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्या…

नागपूर, दि. २६ डिसेंबर : –

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाचा दुरुपयोग करून ३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे दिल्या प्रकरणी चौकशी करावी व त्रांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

२८९ अनव्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदर प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास आणले. रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी सत्तार यांनी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी पद्धतीने भूखंड, वाळूचे ठेके, कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन आपल्या अधिकार कक्षात नसतांना विकल्याचा किंवा वाटप केल्याचा आरोप केला. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देखील सत्तार यांना फटकारले होते याचा उल्लेख देखील दानवे यांनी केला. अशा मंत्र्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे, तसेच सभागृहात यावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली.

एकूण ५ प्रकरण ही न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाचे आदेश डावलून सत्तार यांनी स्वतः निर्णय घेतल्याचे दाखले दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
सविता थोरात यांची मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी कोकण प्रादेशिक विभागिय आयुक्त या प्रकरणातही कोकण विभाग आयुक्त व अधिकारी यांना अज्ञानात ठेऊन सत्तार यांनी निर्णय घेतला.तसेच संभाजीनगर येथील जयेश इन्फ्रा सावंगी नावाच्या  कंपनीला सत्तार यांनी अधिकार नसतानाही नियमबाह्य व बेकायदेशीर आदेश दिले होते. संभाजीनगर मध्ये ही अधिकार नसताना वाळू ठेकेदार यांना वाळूपत्ता बदलून देण्याचं काम केलं. संभाजीनगर जिन्सी येथील कृषी बाजार समितीच्या जागेबाबत ही सत्तार यांनी कार्यक्षमतेबाहेर जाऊन चुकीचा निर्णय दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *