मुंबईच्या रस्त्यावरील खड्याविरोधात ‘आप’चे अनोखे आंदोलन !

0
mumbai pohole

मुंबईच्या रस्त्यावरील खड्याविरोधात ‘आप’चे अनोखे आंदोलन !

मुंबई, दि. १३ जुलै :

नेमेची येतो पावसाळा, नेमेची पडतात खड्डे अशी अवस्था आता संपुर्ण मुंबईची झाली आहे. राज्य शासन, महापालिका दरवर्षी कोट्यवधींचा निधी हा रस्त्यांच्या डागडुजीकरिता खर्च करीत असतात तरीही रस्त्यांवरील खड्डे ‘जैसे थे’ असून ही गंभीरबाब आहे. मुंबईकरांच्या कराचा पैसा खड्ड्यात जातो, असा आरोप आम आदमी पार्टीचे नेते गोपल झवेरी यांनी केला.

शहरातील खड्डय़ांच्या समस्यांबाबत मुंबई महानगरपालिकेचा दावा किती फोल आहे, हे दाखवण्याकरिता आम आदमी पार्टीने मुंबई भर ‘आय लव्ह खड्डा’ मोहीम राबवली. संदर्भात आम आदमी पार्टीने फोर्ट येथे कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेत बोलताना गोपाल झवेरी म्हणाले की, आय लव्ह खड्डा’ मोहीम राबवत असताना कफ परेड, कुलाबा, वाकोला, चेंबूर, खार, जोगेश्वरी पश्चिम, भांडुप, अंधेरी पश्चिम, चर्चगेट, बोरिवली, मालाड, गोरेगाव आणि मानखुर्द यांसारख्या वैविध्यपूर्ण भागात खड्डे दिसून आले. गेल्या २४ वर्षात मुंबई महानगरपालिकेने रस्त्यांवर २९ हजार कोटी रुपये खर्च केले असून मुंबईतील फक्त ८०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले आहे. यासोबतच कंत्राटदारांच्या देखरेखीच्या अभावामुळे खड्डे हे मुंबईतील रस्त्यांचे कायमस्वरूपी ठिकाण बनले असून त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊन मृत्यूही ओढवला आहे. २०१४  ते २०१९ या कालावधीत १५० लोकांचा मृत्यू झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुंबईतील खड्ड्यांमुळे अतिरेकी हल्ल्यापेक्षाही जास्त मृत्यू होतात.

खड्डे आणि मुंबई महानगपालिका हे मुंबईतील गुन्ह्यातील सर्वात प्रसिद्ध भागीदार बनले आहेत. त्यांच्या परिसरातील खड्ड्यांची पाहणी करताना, आपच्या स्वयंसेवकांनी आणि नेत्यांनी एका दिवसात संपूर्ण शहरात खड्डेच चिन्हांकित केले आहे. मुंबईच्या रस्त्यांची परिस्थिती भयान असून मुंबई चा सामान्य माणूस यातून जात आहे, अशी खंत आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास म्हणाले.

“हे अगदी स्पष्ट आहे की महानगरपालिकेने आपले काम करण्याऐवजी केवळ पोथॉल ट्रॅकिंग ॲप आणि हेल्पलाइन्स सारख्या प्रसिद्धी स्टंटमध्ये स्वारस्य आहे. शहराची किंमत केवळ मुंबईकरांच्या उद्ध्वस्त होण्यावर नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जीवनात निदर्शनास आणल्याप्रमाणे आहे. महानगरपालिकेने पुन्हा एकदा सिद्ध केले की त्यांना मुंबईकरांच्या जीवनाची फारशी पर्वा नाही, आशी टीका आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष द्विजेंद्र तिवारी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *